( मला आलेले इमेल आपल्या माहितीसाठी कोणताही बदल न करता देत आहे )
मा.प्रशांत क-हाडे,
जि.प.उच्च प्राथमिक शाळा शेगाव ( खुर्द ) प.स.भद्रावती जि. प. चंद्रपूर
सस्नेह नमस्कार .
आपण शिक्षण क्षेत्रात समाज विकासाच्या प्रक्रियेत कटिबद्ध आहात. त्याबद्दल धन्यवाद. आपला भारत देश हा कृषिप्रधान आणि खेड्यांचा देश आहे, हे आपण जाणताच आणि म्हणूनच आपल्याला देशाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे गरजेचे आहे.
२१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. याचा वापर करून जगातील अनेक देशांनी विकासाची गती पकडलेली आहे. आपल्या देशातही यामुळे अनेक अमुलाग्र बदल लोकांच्या जीवनात घडून येताना दिसताहेत. परंतु या माहिती तंत्रज्ञानाचे फायदे फक्त शहरी लोकांनाच जास्त होत आहे. त्या तुलनेत ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या मागासलेले घटक इ. या लाभांपासून वंचित आहेत. याची मुख्य दोन कारणे म्हणजे